तू सोडून गेलास म्हणून काय झालं
मी जगायचं नाही सोडून दिलं
हिम्मत न हरता मनाला सावरायचं केलं
झाडाचं फूल तोडलं म्हणून
फांदीच पान गळून नाही गेलं
पुढच्या क्षणी झाडाला नवीन फुल उमलून आलं
म्हणून तर मी आता स्वतःला आवरायचं केलं
आयुष्यात पुन्हा नवीन जग शोधण्यासाठी
ध्यान माझं खेचत नेलं
आता त्याला न आठवता मन माझं
दुसरीकडेच वळत गेलं....
प्रिती रोकडे -
No comments:
Post a Comment