Total Pageviews

Thursday, 24 March 2011

कारण मलाच काही कळत नाही......................

हट्टीपणा आहे माझ्या अंगात तर
समजूतदार पणाची काय बातच नाही
कारण  मलाच काही कळत नाही,

मित्र -मैत्रिणी खूप आहेत माझे 
समजून मला कोणी घेतच नाही
कारण मलाच काही कळत नाही,

ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केले 
त्यानी मला कधीच समजून घेतलंच नाही
कारण मलाच काही कळत नाही,

विश्वास ठेवते ज्यांच्यावर
तेच माझा विश्वास घात करतात 
का कारण मलाच काही कळत नाही,

मीपणाने वागते मी आणि
तोच मी पणा माझ्याच अंगी भवतो मला
कारण मलाच काही कळत नाही,

कोणी तरी रागवले म्हणून
मुळूमुळू रडणे आणि,
कोणी तरी जोक केला म्हणून 
खिदीखिदी हसणे एवढेच येते मला
कारण मलाच काही काळात नाही,

चांगले काय आणि वाईट काय
यातील फरक माहितच नाही
म्हणून तर म्हणते मी
कारण मलाच काही कळत नाही
कारण मलाच काही काळात नाही ..........................................................
 



 











प्रिती रोकडे ..................

सांगा ना सख्या तू असं का केलसं...............

सांग ना रे सख्या तू असं का केलसं
जीवनाच्या वाटेवर असं अर्धवट सोडून वेड का केलसं
प्रेमाच्या रंगात रंगताना रंग असे उधळून का गेलास,
तुझं नाव मला माझ्या नावाशी जोडायचं होतं
तेच नाव घेऊन मला या जगात वावरायचं होतं,
रोज आठवण करत होते तुझी
तू माझी अशी आठवण न करता कसा काय राहिलास,
हात हातात घेऊन तुझा मला या वाटेवर चालायचं होतं
पण आज तोच हात सोडून एकटाच कसा काय गेलास,
प्रेमाचे दोन अबोल शब्द तुझे  मला ऐकायचे होते आणि
तेच शब्द ऐकायला माझे कान आतुरतेने वाट पाहत होते,
सांग ना रे सख्या तू असं का केलसं
जीवनाच्या वाटेवर असं अर्धवट सोडून वेड का केलसं ............................

 





























प्रिती रोकडे ...............

का कुणास ठाऊक ??????

का कुणास ठाऊक आज असं का वाटतंय
कुणीतरी माझी सारखी राहून राहून आठवण काढतंय
आठवण काढून माझी,
त्याची मला आठवण करून देतंय
त्याच्या या आठवणीन माझा मन फार झुरतय
काही क्षणातच डोळ्यांमधून असं पाणी का वाहतंय ???????????


 

























प्रिती रोकडे .....
 

मृत्युंजयी................

मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं.
या मरणानं मला दोनदा निराधार केलं.
मी त्याचं सूड घेईन! मी जिंकेन मरणाला !
मला कैवल्यवाणी येते .....
निरामयीन पोथी समोर धरली आणि हात जोडले.
तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली.
कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाडयावर!
वाडा गदागदा हलला. क्षणमात्र आणि दुसरयाच क्षणी त्याचं छप्पर ढासळल!
बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले.
निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजून सुटली
आणि खाली येऊ लागली.
भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली.
त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही.
वरून खाली येणाऱ्या मृत्युकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली.
तिनं मृत्यूला डिवचल  होतं .
ती पोथी वाचायची असा निश्शय करून!
म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता..

                                          पुस्तक - मृत्युंजयी !!!!
                                       लेखक - रत्नाकर मतकरी......

काही नको मला....

काही नको मला फक्त तुझी साथ हवी
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी
केलेस प्रेम माझ्यावर तर ते
आयुष्य भर निभावण्याची तुझी जिद्द हवी
सोडून जाऊ नकोस कधी मला
हीच एक तुझ्या कडून अपेक्षा हवी
जरी मी कधी सोडून गेले तुला
तर ते सहन करण्याची तुझी तयारी हवी
कधी सुखात तर कधी दुखात
तुझ्या आधाराची फक्त मला गरज हवी.......




















प्रिती रोकडे.........
 
 

Monday, 21 March 2011

प्रेमात पडलं की.............

प्रेमात पडलं की हे असच असतं
वेड मन सारखं कविता करायला लागतं
दिवस रात्र फक्त त्याच्या स्वप्नात रमतं
नाही नाही म्हणता मन फक्त त्याचाच विचार करतं
तो समोर नसला की मन उदास होऊन रडतं
नको त्यावेळी त्याच्या फोनची वाट पाहत बसतं
त्याचा फोन किवां sms नाही आला की मन फार झुरतं

त्याने होकार नाही दिला तरी मन त्याच्या वरच मरत
कारण प्रेमात पडलं की हे असच असतं हे असच असतं ...........................



















प्रिती रोकडे ...............
 

Sunday, 20 March 2011

रंगात रंग उधळून ............

अंग अंग भिजले रंगात रंगून नाहले
माझ्या अंगाला रंग लागला मी हळूच लाजले
आज होळीचा रंग बाई गुलाल घेऊन साजले
कान्हाने पिचकारीने पाणी राधा वर उडविले
वसंतात मोर जणू थुई थुई नाचू लागले  
रंगात रंग उधळून मी धन्य धन्य जाहले 
जणू सप्तरंगी रंगात मी इंद्रधनुष्य पाहिले 
लाल, गुलाबी, पिवळा रंग एकत्र सामावले 
त्या सप्तरंगी रंगांना जणू माझे स्पर्शच लाभले ..........





 



काय तुझ्या मनात

काय तुझ्या मनात
सांग माझ्या कानात
आपण दोघे राजा राणी 
हरवून जाऊन स्वप्नांच्या ध्यानात !!!!!!!!!!!!!
 
 
 
 
 
 
 
 
 
  प्रिती रोकडे ........

Saturday, 19 March 2011

झम्पी .....................

एक व्हती  झम्पी लई मस्ती करायची
दिवस उगवला की गावभर हिंडायची
लोंकांची भांडण सतत आणायची
दिवसभर हिंडून घराकडं निघायची
आईन विचारलं की म्या काही नाई केलं म्हणायची
आईन मारलं की लई मुळूमुळू रडायची
रडत रडत कोपरयात रुसून बसायची
बापान लाड केला की खुद्कून हसायची



















   प्रिती रोकडे...............

Friday, 18 March 2011

मी आणि माझा रोजचा प्रवास ..........,


         तशी मी रोज ऑफिस मधून ७ :०० ला निघते आणि बस stop वर उभी राहून ८७ नंबर बसची वाट पाहते. मग बस आली कि ८:०० वाजे पर्यंत घरी पोहोचते. तारीख १७.०३.२०११, वार गुरुवार, वेळ ७:०० ला ऑफिस मधून सुटल्या वर पुन्हा रोज सारख बस stop उभी राहून बसची वाट पाहत होते पण काही करून ८७:०० नंबर बस लवकर येईना अर्धा तास वाट पाहिली मग थोडया वेळाने ९१ नंबरची बस आली. मी कशी तरी बस मध्ये चढली आणि बस मध्ये उभी राहिली, एवढी गर्दी होती कि बसण्यासाठी  सीट पण खाली नव्हती. बस दादर(प्रभादेवी) पोर्तुगीज चर्च पासून ७:३० ला निघाली थोडी पुढे गेली आणि ट्राफिक एवढी होती कि ती थांबत थांबत चालत होती त्यात गर्मीचा दिवस एवढे गरम होत होते कि विचारू नका, बसयाला जागा नाही हवा यायला जागा नाही. 
         थोडया वेळाने बस माहीम पर्यंत आली पण तिथे हि ट्राफिक मग मला अजून राग आला आणि मी  मनातच बोलू लागले कधी घरी पोहोचणार?? थोडा वेळ मी जरा शांत उभी राहिली, तितक्यात माझ्या समोर असलेल्या सीट वर बसलेल्या महिलेने मला विचारले कि किती वाजले?  मी म्हणाली  ७:४५ झाले. ती अजूनच विचारात पडली कि मी कधी घरी जाणार कारण तिच्या घरी तिचे लहान बाळ होते ती सारखी बोलत होती कि ते वाट पाहत असेल कि रडत असेल, तेवढयात त्या महिलेला घरून फोन आला कि कुठे आहेस ती महिला बोलली कि मी बस मध्ये आहे आणि खूप ट्राफिक  आहे म्हणून काही क्षणात फोन वर बोलता बोलता फोन बंद पडला ती अजूनच वैतागली मला त्या महिले कडे पाहून जरा कीव वाटू लागली पण बस मात्र  काही जागे वरून हलतच नव्हती. पण त्या महिलेची चिंता वाढतच चालली होती  ती मला मधून-मधून वेळ विचारत होती कि किती वाजले.
         त्यानंतर त्या महिलेच्या पुढच्या सीट वर एक मुलगी आणि तिची वाहिनी बसली होती तिच्या कडे पण लहान बाळ होते पण ते झोपलेले होते काही क्षणात ती लहान बाळ उठले आणि रडू लागले कारण त्या बाळाला गरम होत होते तिची आई तिला शांत करत होती पण ती लहान मुलगी शांत होईना खूपच रडत होती. थोडया वेळाने बस थोडी चालू झाली मग जरा थोडी हवा येऊ लागली मग ती लहान मुलगी शांत झाली. त्या मुलीची आजी पण तिच्या सोबत होती तिला हि घरची चिंता वाटू लागली कि माझे दोन मुले आहेत त्यांना हि कामाला जायचे आहे त्यांना पण जेवण नाही कधी पोहोचणार घरी??  असे त्या आजी पण बोलू लागल्या. आणि ती महिलाही हि मधून मधून बोलतच होती कधी घरी पोहोचणार ???? 
        काही वेळाने माझ्या बाजूला उभी असलेली महिला पण मला विचारू लागली कि किती वाजले?  माझ्या घरी पण माझे लहान मुल आहे ते दीड वर्ष्याचे आहे ते रडत आहे कि झोपले आहे असे मला सांगत होती. मी हि ते ऐकत होते. तशी मला पण आईची आठवण झाली कि माझी आई पण वाट पाहत असेल माझी? कोणी आपल्या हातातल्या घड्याळ कडे  पाहत होती अजून किती वेळ हि ट्राफिक असणार आम्ही घरी कधी पोहोचणार? तेवढयात मी आईला फोन केला आणि सांगितले कि मला उशीर होईल घरी यायला, खूप ट्राफिक आहे आणि मी माहीम पर्यंत पोहोचली आहे तितक्यात आई बोलली कि निट ये घरी . थोडया वेळात बस माहीम पासून निघाली आणि बांद्रा पर्यंत पोहोचली सगळ्या प्रवसांच्या जीवात जीव आला आणि बस भर वेगात चालू लागली. तसा मला पण आनंद झाला कि मी आता घरी जाणार कारण मला भूक पण खूप लागली होती आणि बस मध्ये उभे राहून पाय पण दुखत होते .मग मी बांद्रा ला उतरली आणि घरी आली. घरी येऊन आई बाबांना सगळा घडलेला बस प्रवास प्रकार सांगितला . 
        मला फक्त या लिहिलेल्य लेखनातून  एवढच सांगायचे आहे  कि, आईला तिचे मुल लहान असू कि मोठे असू त्याची  तिला चिंता असते. शेवटी ती एक आई आहे. बोलतात ना....,
       "स्वामी तिन्ही जगांच्या आई विना भिकारी "........










                                                                                                           


         
                                                                                     प्रिती रोकडे .............

Wednesday, 16 March 2011

तू तिथं मी..,

तू जिथे जिथे जाशील
तिथे तिथे तुझ्या पाउलखुणा असतील
त्याच पाउलखुणाना मी माझ्या म्हणून समजील
आणि तू नसताना हि त्याच पाउलखुणा मी जपून ठेवील.............






प्रिती रोकडे ............................

फक्त तुझ्या साठी.................

तुझ्या हृदयात मला थोडीशी जागा दे
जास्त का होईना पण थोडासा आश्रय दे
त्या गडगडणार्या मेघांच्या आवाजने
तुझ्या घट्ट मिठीत मला आधार दे
तुझ्या त्या भारावून टाकणाऱ्या नयनांना
माझ्या नयनात हरवून दे
तुझ्या गोडगुलाबी ओठांनी माझ्या
नाजूक ओठांना स्पर्श दे
तुझा हात माझ्या हातांशी जुळवून घे
माझे मन तुझ्या मनाशी मिळवून घे
तुझ्या नावशी माझ्या नावाला अर्थ दे
प्रेम करते तुझ्यावर एक हे माझे 
म्हणणे तू जरा अवश्य समजून घे ............




















                                                               प्रिती रोकडे .............................


 

तुझ्या ओठांवरील बोल.........

ते बोल मनातलं मनात ठेवण्यापेक्षा
मनातून ओठांवर येऊ देत
तुझे बोल,
मग बोलशील की
मला काय बोलायचे होते ते बोल
मी शेवटी बोलून टाकले बोल
आता बोल आता बोल

बोलून टाक तुझे बोल !!!!!!!!!


                        













   प्रिती रोकडे ..........