Total Pageviews

Sunday, 26 June 2011

कशाला ??

असं सोडून जायचंच होतं तर 
माझ्या आयुष्यात आलासच कशाला??
असं सुंदर स्वप्न दाखवायचं होतं 
तर स्वप्नं दाखवलसच कशाला??
असा हात हातात धरून कायम सोडूनच दयायचाच होता
तर हात हातात घेतलासच तरी कशाला ???
तुला दिलेले गुलाबाचे फुल पायाखाली तुडवायचेच  होते 
तर माझ्या कडून त्याचा स्वीकार केलासच तरी कशाला ??
तुझं प्रेम नव्हतंच माझ्या वर तर प्रेमाच्या चार भाषा 
शिकवल्यास तरी कशाला??
असं शेवट पर्यंत डोळ्यात अश्रू  दयायचेच होते तर
आनंदी क्षण दाखवलेस तरी कशाला ????
आयुष्य भर साथ देईन तुला असं वचन देऊन परत माघार 
घेतलीसच कशाला ??
माझं मन असं दुखवायचंच होतं तर जुळवलस तरी कशाला ??
तू मला विसरून गेलास मग मी तुला आठवू तरी कशाला ???






















                                               प्रिती रोकडे .................

Saturday, 18 June 2011

Marathi Buzz Mandal. Slideshow

Marathi Buzz Mandal. Slideshow: "TripAdvisor™ TripWow ★ Marathi Buzz Mandal. Slideshow ★ to Mumbai (Bombay). Stunning free travel slideshows on TripAdvisor"

Saturday, 11 June 2011

" मोबाईल फोन "

एक नुसता मोबाईल फोन 
सांगा पाहू बोलतंय कोण ??
पण लय भारी त्याची रिंग टोन
वायब्रेट करून अंग होतंय रोम रोम
असतो बोलताना सवांध फक्त व्यक्तींचा दोन 
मोबाईलच्या शोकामुळे बिझी झालाय प्रत्येक झोन...,




                                                                       
                                                                              














 प्रिती रोकडे ........





Thursday, 9 June 2011

" तिजोरी "

तुझ्या आठवणींची आता मी तिजोरी बनवली आहे
त्या तिजोरी मध्ये तुझ्या आठवणी साठवून ठेवल्या आहे
तू दिलेल्या या सर्व गोष्टींचा प्रेमळ (प्रेम, साथ,नात,
स्पर्श, बोल) साठा करून ठेवला आहे
तुझ्या ह्या आठवणी मला सोन्याहून ही परिपूर्ण आहे
कधी आली तुझी आठवण तर हीच तिजोरी खोलून मी माझ्या 
मोडलेल्या हृदयाशी कवटाळल्या आहे
त्या तिजोरीच्या  दर्पणात मी आपलं नात शोधत आहे
कारण मी या आठवणींची तिजोरी बनवली आहे..




                                                     




























                                                                                      प्रिती रोकडे ..
                                                 
 

Wednesday, 8 June 2011

पाऊस....,

आला आला गार वारा 
मन माझे मोहून गेला 
आता येई रिमझिम 
पावसाच्या धारा,
हळूच वारा सांगून गेला 
तू पण ये ग सखे या 
पावसात अन घे माझ्या 
संगे बेधुंद पावसाचा मारा..,



























                                                   
                                                                     प्रिती रोकडे ............

                    
                                

Sunday, 5 June 2011

" आवडेल मला "

तुझ्या सोबत पावसात चिंब भिजायला आवडेल मला 
पावसाच्या सरी आल्यावर ते टपोरे थेंब माझ्या चेहऱ्यावर 
पडताच तेच थेंब तुझ्या हाताच्या मुठीत जमा केलेलेले आवडेल मला,
त्या जोरदार पडलेल्या पावसात मेघाच्या गडगड आवाजाने 
तुझ्या अलगद अश्या मिठीत यायला आवडेल मला,
समुद्रकिनारी  येणाऱ्या लाटांसोबत तुझ्या हातात 
हात देऊन मनसोक्त फिरायला आवडेल मला,
त्या थंडगार पावसात गरम गरम भाजलेल्या मक्याचे कणीस 
तुझ्या बरोबर खायला आवडेल मला,
तोच पाउस सारखा सारखा बरसत राहून तुझ्या त्या 
पावसातल्या आठवणी घेऊन बरसायला आवडेल मला....




                                                                                   




















                                           प्रिती रोकडे .........................
 

Saturday, 4 June 2011

प्रेम हे प्रेम असतं तुमच आमचं सेम असतं................

               प्रेम हे प्रेम असतं तुमच आमचं सेम असतं . कुणी तरी  करतं म्हणून ते करायचं नसतं, ते आपोआपचं होत असतं. त्याला फक्त एका चांगल्या व्यक्तीची गरज असते. की जो आपल्याला समजून घेणारा आपल्या प्रत्येक गोष्टीत साथ देणारा, कोणत्या ही संकटी आपल्याला मदतीचा हात देणारा असावा. 
               प्रेम असत दोन जीवाचं आत्मचरित्र  नसतो भातुकलीचा खेळ लहानपणी भातुकलीच्या खेळात  आपण  भावला  भावलीचा लग्न  लाऊन देतो. पण ते भातुकलीच्या खेळा पर्यंतच मर्यादित असतं. त्याचप्रमाणे 
प्रेम करायचं म्हणून करायचं नसतं त्यामागे दोन मन जोडलेली असतात. एकमेकांचा एकमेकांवर असलेला विश्वास कायम असावा लागतो, ते कुठेही डगमगलेला नसावा लागतो. जीवापाड एकमेकांवर प्रेम असावं लागतं. त्यातील प्रेमाचा आत्माविश्वास टिकवावा लागतो.
             प्रेम असतं दोन आत्म्यांचा मिलाप त्याच बरोबर दोघांचा असलेला समजूतदारपणा, समंजसपण, आणि महत्वाचं म्हणजे दोघांच्या भावना या सर्व गोष्टींचा मेळ असावा लागतो. तरच याला आपण प्रेम करणं किंव्हा प्रेम मिळणं असं म्हणायला काहीच हरकत नाही. काही लोक प्रेम होतंय म्हणून करतात पण त्या मागे त्यांचं काही तरी कारणस्थान असतं. आणि त्या प्रेमाला काहीही योग नसतो. ते फक्त एकमेकांच्या भावनांशी खेळत असतात त्याला शेवट असा काहीच नसतो. पण जे खऱ्या अर्थाने प्रेम करतात त्याचा शेवट नक्कीच खरा ठरतो कारण ते एकमेकांचा साथ आयुष्यभर निभावनाच्या तयारीत असतात. तर काही जण मधेच एकमेकांचा साथ सोडून जातात. यातून एकच मार्ग हाती लागतो ते म्हणजे आत्माहत्या.
                        या जगात खरं प्रेम करणारे ही पुढे आयुष्यभर साथ न देताच आपल्या प्रेमाचा शेवट करतात. कारण त्यांना त्यांच्या समाजाची , आपल्या परिवाराची इज्जत कायम ठेवायची असते, पण ते प्रेम करण्याच्या आधी याचा विचार करत नाही त्यांना नंतर याची जाणीव होते.    
                        अजून मला असं बोलावसं वाटतं की याच जगात एक तर्फ्फी  प्रेम करणारे ही असतात. त्यांना त्यांचं प्रेम नाही मिळालं की वाट्टेल ते करायला तयार असतात. तर या जगात मी तुझ्या वर जीवापाड प्रेम करतो असे आश्वाशन देणारे ही खूप असतात. पण त्यांच्या मनात असं काहीच नसतं. त्यांना फक्त दुसर्याच्या भावनांशी खेळायला मज्जा येत असते. याचा ते पुरेपूर वापर करून घेत असतात. कारण त्यात शेवट शेवट पर्यंत प्रेमाचा एक ही अंश नसतो.
               




                                                                                                        प्रिती रोकडे .......................