Total Pageviews

Sunday, 22 April 2012

"असंच मनाला वाटलं"

          असंच मनाला वाटलं म्हणून जी व्यक्ती जेव्हा कोणाच्या नं कोणाच्या प्रेमात पडते तेव्हा तो/ती  नक्कीच त्यासाठी  वेडा/वेडी झालेली आहे असं म्हणतात. पण त्यांच्या मनात काय दडलेलं असतं हो कोणाला माहीत नसतं. त्यानां सारखा हेच वाटत असतं की ती/तो व्यक्ती आपल्या सोबतच असावा/ असावी. टी. व्ही .किंव्हा फिल्म मध्ये दाखवतात प्रेम मिळालं तर ठीक नाही तर मी नाही जगू शकत तिच्याशिवाय/ त्याच्याशिवाय असं काही तरी, पण खरं प्रेम मिळतं का कोणाला कधी?  की फक्त वर वर प्रेम करणं असं काही तरी म्हणजे एकमेकांनी केलेली एकमेकांची फसवणूक???  आपण पुष्कळदा ऐकलेल्या, वाचलेल्या प्रेम कहाण्या हिर-रांझा, सलीम- अनारकली, रोमिओ- जुलीएत, इत्यादी,..या प्रेम कहाण्या तर खरंच सच्च्या होत्या. पण खरंच प्रेमात व्यक्ती  वेडा/ वेडी होतो/ होते. त्यांना मग दिवस काय नि  रात्र काय सारखंच. सतत एकमेकांना sms करणं, फोन करून विचारणं तू कुठे आहेस? काय करतोस/काय करतेस? असं काही तरी, पण आपण जेव्हा कोणावर प्रेम करतो हेय त्या व्यक्तीला कितपत माहीत असतं आणि ती व्यक्ती आपल्यावर खरंच प्रेम करते हे माहीतच नसतं. पण आपण त्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत असतो. तू फक्त माझीच आहेस/तू फक्त माझाच आहेस. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, जगू शकत नाही असं सारखं एकमेकांना बोलत असतात. किती गोडवा दडलेला असतो या प्रेमात खरंच..


          आता बघाना प्रेम करणं हे काही वाईट नाही असं म्हणणं यात काही गुन्हा नाही. कारण प्रेम असते दोन जीवांचा एकमेकांवर असलेला विश्वास, प्रेम असते एकमेकांचा आधार, सुखं-दुखात साथ. प्रेमात सगळं काही माफ असतं चूक ही मग तिच्या कडून होऊ किंव्हा त्याच्या कडून झाली असेल. प्रेम होत म्हणून करायचं नसतं, कोणी केलं म्हणून करायचं नसतं त्याला आधी समजून घ्याचं असतं. शाळा महाविद्यालयात आपण पहिलेच असेल की ते झालेलं पाहिलं वहिल प्रेम :) ती एकमेकांशी भिडलेली नजर, मग त्याने आपल्या मित्रांना म्हणावं मी तिला कस बोलू की तू मला आवडतेस आणि तिनेहीआपल्या मैत्रिणीला हेच म्हणावं. पण जेव्हा खरंच कोणतीही व्यक्ती कोणावर खरं प्रेम करत असते तर ते त्यांना खरंच मिळणं शक्य असतं का? तू मला भेटशील की नाही की आपला प्रेम हे फक्त स्वप्न बनूनच राहील का? प्रेम असतं एक नातं जे नातं समजून घेतल्याशिवाय त्या नात्याच्या रेशीम बंधात गुंतता येत नाही कारण नातं हे असं बंधन आहे की ते तुटल्याशिवाय तुटत नाही मग त्याला कोणाचाही अविष्कार असावा. तू माझ्या साथ आहे तर मला कश्याची भीती आहे.

मी केलेली छोटीसी कविता--
                                                                    काही नको मला
                                                                 फक्त तुझी साथ हवी
                                                  माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी 
                                                          सोडून जाऊ नकोस मला कधी 
                                                       हीच तुझ्या कडून एक अपेक्षा हवी....................,


                                                                                                                                                      प्रिती रोकडे-


No comments:

Post a Comment