Total Pageviews

Thursday, 24 March 2011

मृत्युंजयी................

मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं.
या मरणानं मला दोनदा निराधार केलं.
मी त्याचं सूड घेईन! मी जिंकेन मरणाला !
मला कैवल्यवाणी येते .....
निरामयीन पोथी समोर धरली आणि हात जोडले.
तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली.
कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाडयावर!
वाडा गदागदा हलला. क्षणमात्र आणि दुसरयाच क्षणी त्याचं छप्पर ढासळल!
बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले.
निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजून सुटली
आणि खाली येऊ लागली.
भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली.
त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही.
वरून खाली येणाऱ्या मृत्युकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली.
तिनं मृत्यूला डिवचल  होतं .
ती पोथी वाचायची असा निश्शय करून!
म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता..

                                          पुस्तक - मृत्युंजयी !!!!
                                       लेखक - रत्नाकर मतकरी......

No comments:

Post a Comment